एकमेव मराठी शैक्षणिक वेबसाईट

राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना

राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील गरीब व आर्थिकदृष्ट्या कुटुंबातील मुलींना घरापासून शाळेत जाण्यासाठी शासनामार्फत मोफत सायकलींचे वाटप करण्यात येते. राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजना ही शालेय विद्यार्थिनींना मोफत सायकल किंवा सायकल खरेदीसाठी आर्थिक मदत देणारी योजना आहे. या योजनेअंतर्गत, इयत्ता ८ वी ते १२ वी मध्ये शिकत असलेल्या आणि ज्यांचे घर आणि शाळा यांच्यात ५ किलोमीटर पेक्षा जास्त अंतर आहे, अशा विद्यार्थिनींना सायकलसाठी मदत दिली जाते.

महाराष्ट्र राज्यात प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाबरोबरच माध्यमिक शाळांचा विकास व विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. शिक्षण हे व्यक्तिमत्व विकासाचे मूलभूत साधन असल्यामुळे सुरुवातसुनच राज्यात स्त्री शिक्षणाला महत्व देण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने शासन महिलांसाठी विविध योजना राबविते. मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करण्याकरीता व मुलींना शिक्षणाकडे आकर्षित करून घेण्याच्या दृष्टीने या धोरणांतर्गतच माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील इयत्ता 8 वी च्या मुलींसाठी मोफत लेडीज सायकलीचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ‘राजमाता जिजाऊ सायकल वाटप योजना’ सुरू करण्यास शासनाची निर्णय घेतला.

योजनेचा उद्देश:

  • मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे.
  • शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे.
  • ग्रामीण आणि डोंगराळ भागातील मुलींना शिक्षणासाठी सोयीस्कर मार्ग उपलब्ध करणे

योजनेअंतर्गत लाभ:

पात्र विद्यार्थिनींना मोफत सायकल किंवा सायकल खरेदीसाठी आर्थिक मदत (उदा., ५००० रुपये) दिली जाते.

पात्रता:

  • इयत्ता ८ वी ते १२ वी मध्ये शिकणाऱ्या शालेय विद्यार्थिनी.
  • घरापासून शाळेचे अंतर ५ किलोमीटर पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे:

  • विद्यार्थिनीचे शाळेचे ओळखपत्र.
  • विद्यार्थिनीचा आधार कार्ड.
  • वयाचा पुरावा (उदा., जन्म प्रमाणपत्र).
  • पालकांचा उत्पन्नाचा पुरावा (जर आवश्यक असेल, तर).
  • इतर आवश्यक कागदपत्रे (जसे, शाळेने दिलेले प्रमाणपत्र).
  • याव्यतिरिक्त, काहीवेळा बँक खात्याची माहिती आणि मोबाईल नंबरची माहिती देखील आवश्यक असू शकते

योजनेचा फायदा:

  • राजमाता जिजाऊ सायकल वाटप योजना अंतर्गत ग्रामीण भागातील शाळांमध्ये इयत्ता ८ वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील मुलींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात येते.
  • मुलींना उन्हात, पावसात मैलोनमैल शाळेत चालत जाण्याची गरज भासणार नाही.
  • शाळेत मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी होईल.
  • मुली शिक्षणाकडे आकर्षित होतील.
  • मुलींचा शाळेत येणा जाण्याचा महत्वाचा वेळ वाचेल व त्या वेळेचा उपयोग त्या अभ्यास करण्यासाठी वापरू शकतील.

योजनेअंतर्गत अर्ज करण्याची पद्धत:

  • अर्जदार विद्यार्थिनीला आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात शालेय शिक्षण व क्रीडा विभागात जाऊन राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व सदर अर्ज जमा करावा लागेल.
  • अधिकाऱ्यांकडून अर्ज व कागदपत्रांची तपासणी करून लाभ दिला जाईल.
  • विद्यार्थिनीला आपल्या शाळेतील मुख्याध्यापकांकडून राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
  • अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व सदर अर्ज मुख्याध्यापकांकडे जमा करावा लागेल.
  • मुख्याध्यापक जमा अर्ज शालेय शिक्षण व क्रीडा विभागात जमा करतील.
  • शिक्षण अधिकारी जमा अर्ज व कागदपत्रांची तपासणी करून लाभ देतील

योजनेच्या अटी व शर्ती:

  • लाभार्थी मुलीला शाळेमध्ये सायकल खरेदी केल्याचे बिल जमा करणे आवश्यक आहे.
  • फक्त महाराष्ट्र राज्यातील मुलींनाच राजमाता जिजाऊ मोफत सायकल वाटप योजनेचा लाभ दिला जाईल.
  • इयत्ता ८ वी तील दारिद्र्य रेषेखालील मुली या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील,
  • फक्त ग्रामीण व नगरपरिषद क्षेत्रातील शाळांनाच सदर योजना लागू राहील.
  • अर्जदार विद्यार्थिनीचे घर आणि शाळा यांमधील अंतर किमान  ५ किलोमीटर असणे आवश्यक आहे.
  • केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर योजनांमधून अर्जदार मुलीने सायकलीचा लाभ घेतला असल्यास तिला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार मुलीला इयत्ता 7वी मध्ये कमीत कमी 75 टक्के गुण असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार मुलगी हि शासन मान्यता प्राप्त अनुदानित माध्यमिक शाळेत शिक्षण घेत असावी.
  • अर्जदार मुलीचे आई किंवा वडील किंवा घरातील इतर कोणी सदस्य शासकीय कार्यालयात नोकरी करत असता कामा नये.
  • शहरी भागातील शाळांमधील मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही

Scroll to Top